या टँकरमुळे गावातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा अधिक सुलभ व सोयीस्कर होणार असून उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. ग्रामपंचायत स्तरावर जलसंपदा व्यवस्थापन सशक्त करण्यासाठी व नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
गावातील सर्वसामान्य नागरिकांना याचा थेट लाभ होणार असून, स्वच्छ पाणी मिळविण्याचा हक्क अधिक प्रभावीपणे अमलात येणार आहे. ग्रामपंचायत प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे आभार मानले आहेत.